पोस्टाच्या हंगामी १४० मराठी कामगारांना कायम करावे यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार: आमदार आशिष शेलार
●ग्लोबल चक्र न्यूज
मुंबई: पोस्टाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने चढ-उतरन्यासाठी (LOADING-UNLOADING) भरण्यासाठी पोष्ट खात्याने मुंबई मधिल विविध पोस्ट ऑफिस मध्ये हंगामी १४० कर्मचाऱ्यांची भरती केलेली होती. या कर्मचाऱ्यांना केवळ ३९/- रुपये तास या प्रमाणे पगार मिळत असे म्हणजे किमान वेतन कायदा नुसार सुद्धा त्यांना पगार न देता पोस्ट ऑफिस कामगारांचे शोषण करीत होते त्यामुळे या कामगारांनी किमान वेतन मिळावे एवढी माफक मागणी केल्याने सन २०१८ पासून १४० मराठी कुटुंबाची उपासमार होत आहे तेव्हा त्यांना कामावर रुजू करून घेऊन किमान वेतनाची कायद्याची अंमलबजावणी करावी अशा मागणीचे निवेदन नगरसेविका सौ. आशाताई सुभाष मराठे यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी चे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांना दिले. त्यावेळी मी पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देणार असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. या शिष्टमंडळात पोस्टाचे कर्मचारी पंकज जगताप, प्रताप बनसोडे, प्रणया कडवडकर, भाग्यश्री कोठावळे, सुभाष मराठे इत्यादी मान्यवरांचा समावेश होता.