हैडलाइन

“टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे मुंबईत जंगी स्वागत”

टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघावर मात करून जगज्जेतेपदावर नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. देवनार येथील त्यांचे निवासस्थान असलेल्या सोसायटीत माजी खासदार राहुल शेवाळे देखील राहतात. मंगळवारी दुपारी निवासस्थानी परतलेल्या सूर्यकुमार यादव यांचे शेवाळे कुटुंबीय आणि इतर सोसायटी सदस्यांच्या वतीने ढोलताशांच्या गजरात  स्वागत करण्यात आले.


दैदिप्यमान कामगिरीबाबत पुष्पगुच्छ आणि शाल - श्रीफळ देऊन शेवाळे यांनी त्यांचे अभिनंदन केले त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी त्यांचे औक्षण करण्यात आले. या स्वागतासाठी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 


यावेळी बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, "भारतीय संघाने क्रिकेटच्या टी 20 विश्वचषकावर आपले नाव कोरले, तो क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता. या जगज्जेत्या संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव आपल्या घरी परतले. त्यावेळी आमच्या सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या आणि शिवसैनिकांच्या वतीने त्यांचे स्वागत करणे, हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे. टीम इंडियाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!"





Most Popular News of this Week

वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप...

'पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप २०२६' मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या...

राहुल शेवाळे यांच्या...

शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या वतीने इयत्ता KG, Sr. KG व इयत्ता पहिलीमध्ये...

शाळेच्या पहिल्या दिवशी...

जिल्हा परिषद शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित...

दिव्यांगांच्या सर्वांगीण...

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि...

पिण्याच्या पाण्याच्या...

'अल नि‍नो'मुळे पावसाने ओढ दिल्‍याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा...

जय पवार यांची मान्सूनच्या...

महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि...