हैडलाइन

गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ!

नागपूरमध्ये सुरू असलेल्या U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपला आज एक वेगळीच उंची मिळाली, जेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात होताच संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून गेले, आणि गडकरी यांनी स्टेजवरून खेळाडूंना दिलेल्या प्रेरणादायी संदेशाने स्पर्धेला नवा जोश मिळाला.


या प्रसंगी प्रमोद कुमार बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे महासचिव, राहुल शेवाळे महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष, रणजीत सावरकर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष, राकेश तिवारी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव, मिलन वैद्य महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे कोषाध्यक्ष यांच्यासह आशिष जयस्वाल, कृपाल तुमाने, दीपक सावंत, संजय निरुपम, मनीषाताई कायंदे, किरण पांडव, श्रीमती देवांग आणि अर्जुन अवॉर्ड विजेते गोपाल देवांग यांची उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले,

“खासदार चषकाच्या माध्यमातून आम्ही ६५ विविध खेळांना प्रोत्साहन देत आहोत. बॉक्सिंगसारखा दमदार खेळही त्यात महत्त्वाचा भाग आहे.” त्यांच्या या वक्तव्याने खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.विशेष म्हणजे, गडकरी यांनी बॉक्सिंगचे ग्लोव्हज परिधान करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांच्या या कृतीने आणि संदेशाने उपस्थित खेळाडू व प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. देशभरातून आलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत गडकरी म्हणाले,“ही स्पर्धा तुमच्यासाठी मोठं व्यासपीठ आहे… मेहनत करा, देशाचं नाव उज्वल करा.”या भव्य उद्घाटनामुळे नागपूर शहरात बॉक्सिंगचा उत्साह शिगेला पोहोचला असून, देशभरातील युवा बॉक्सर आता रिंगमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

                 


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

गोरेगाव (पश्चिम) येथील मृणाल गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ...

धमक्यांना न घाबरता जनतेची...

धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार; पोलिस आणि महानगरपालिका...

चेंबूरमध्ये ‘तुंबाडची...

सध्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मराठी...

अदाणी ग्रीन एनर्जी ने रचा...

भारत की सबसे बड़ी नवीकरणीय ऊर्जा कंपनी Adani Green Energy Limited (AGEL) ने गुजरात के खवड़ा में...

मुंबईकरांनी पाण्याचा...

मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून, तिची अंमलबजावणी...

नालेसफाईच्या नावावर...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई...