हैडलाइन

अजित डोवाल यांना ‘राफेल डील'चा अधिकार होता का?, काँग्रेसचा सवाल

नवी दिल्ली : राफेल डीलवर एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना काँग्रेसने पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावले आहेत. राफेल सौद्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून मोदी सरकारच्या ३६ राफेलची किंमत युपीएच्या १२६ विमानांएवढी असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. 

काँग्रेसने आज राफेल करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुरजेवाला यांनी चौकीदाराची चोरी पकडली गेल्याचा दावा केला. मोदींनी भारताच्या तिजोरीला चुना लावला आहे.  इंडियन निगोसिएशन टीमनुसार (आयएनटी) ३६ राफेल विमानांची किंमत युरो ८४६० दशलक्ष डॉलर बनते. आज युरोची किंमत ८० रुपये आहे. तेव्हाचे ७५ रुपये युरोमागे पकडले तर ही किंमत ६३ हजार ४५० कोटी रुपये होते. मोदी हीच किंमत ७८९० दशलक्ष डॉलर ५९ हजार कोटी रुपये सांगत फिरत आहेत.

मोदींनी युपीएच्या काळातील राफेल विमानांची किंमत तब्बल ३५० पटींनी वाढविली. युपीए सरकारने राफेल विमानांमध्ये जी प्रणाली विचारात घेतली होती, तीच प्रणाली मोदींच्या राफेल विमानांमध्ये आहे. यात कोणताही बदल केलेला नाही. काँग्रेसच्या १२६ विमाने खरेदी करताना तंत्रज्ञान हस्तांतरणही नमूद होते. मात्र, मोदींनी ३६ विमानांच्या खरेदीमध्ये  तंत्रज्ञान हस्तांतरणालाही बगल दिली आहे. उरलेल्या विमानांनंतर हे हस्तांतरण होणार आहे आणि यासाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे, असा आरोप सुरजेवाला यांनी केला. यातील १० हजार कोटी रुपये दसॉल्ट कंपनीला देण्यात आले आहेत. 

३६ विमाने खरेदी करण्याचा निर्णय १२, १३ जानेवारी २०१६ मध्ये अजित डोवालद्वारा प्रâान्समध्ये घेण्यात आला. इंडियन निगोसिएशन टीमने हा निर्णय घेतला नाही. १३ जानेवारीलाच करार करण्यात आला. २०१७ मध्ये आलेल्या टिप्पणीमुळे खळबळ माजली होती. पंतप्रधानांनी यावर दबाव आणला आणि पंतप्रधान कार्यालयाने कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचा खुलासा केला होता. मात्र, आयएनटीच्या अहवालात अंतिम डील आयएनटीने केलीच नसल्याचे म्हटले आहे, असा दावा सुरजेवाला यांनी केला. तसेच जर डोवाल यांनी डील केली तर त्यांना अधिकार होता का? नाही. याचाच अर्थ मोदींच्या प्याद्यांनी हे काम केले. मोदींनी अधिकाराचा गैरवापर करत सरकारी खजिन्याला चुना लावला असल्याचा गंभीर आरोप सुरजेवाला यांनी केला.



Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

गोरेगाव (पश्चिम) येथील मृणाल गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ...

धमक्यांना न घाबरता जनतेची...

धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार; पोलिस आणि महानगरपालिका...

चेंबूरमध्ये ‘तुंबाडची...

सध्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मराठी...

अदाणी ग्रीन एनर्जी ने रचा...

भारत की सबसे बड़ी नवीकरणीय ऊर्जा कंपनी Adani Green Energy Limited (AGEL) ने गुजरात के खवड़ा में...

मुंबईकरांनी पाण्याचा...

मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून, तिची अंमलबजावणी...

नालेसफाईच्या नावावर...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई...