हैडलाइन

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडीया व्यवस्थापनाला दणका

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व दडपशाही विरोधात अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघाचे सरचिटणीस सुहास माटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विमानतळाजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या या तीव्र आंदोलनामुळे अखेर एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाला झुकावे लागले व कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात आल्या.


कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या तीव्रतेमुळे अखेर एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाला झुकावे लागले. कामगारांच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र सचिव राजेंद्र भिसे, अजित आचरेकर उपस्थित होते. तसेच एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून सहाय्यक महाव्यवस्थापक महेश कांबळे, मानव संसाधन व्यवस्थापक सुनीता भरदोज आणि त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाला प्रत्यक्ष आंदोलनाच्या स्थळी येऊन थेट कामगारांची भेट घेतली. या आंदोलनास सर्व कामगार बांधव व पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आणि आंदोलन यशस्वी केले. कामगारांच्या एकजुटीमुळेच हा लढा अधिक मजबूत झाला असून भविष्यातही कामगारांच्या हक्कांसाठी संघटना कायम ठामपणे उभी राहील असे आश्वासन अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिले.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

गोरेगाव (पश्चिम) येथील मृणाल गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ...

धमक्यांना न घाबरता जनतेची...

धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच राहणार; पोलिस आणि महानगरपालिका...

चेंबूरमध्ये ‘तुंबाडची...

सध्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मराठी...

अदाणी ग्रीन एनर्जी ने रचा...

भारत की सबसे बड़ी नवीकरणीय ऊर्जा कंपनी Adani Green Energy Limited (AGEL) ने गुजरात के खवड़ा में...

मुंबईकरांनी पाण्याचा...

मुंबई महानगरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून, तिची अंमलबजावणी...

नालेसफाईच्या नावावर...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई...