भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ,अतिरिक्त जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, तहसिलदार सचिन चौधर आदी मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचबरोबर टाऊन हॉल येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने जरूर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी याप्रसंगी केले.